नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सध्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.त्यामुळे आपण उन्हामध्ये जात असताना कोण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे हे आपण सविस्तर जाणून घेतले पाहिजे कडक ऊन वाढल्यामुळे उष्माघाताचे प्रकार आपणास पहावयास मिळत आहे. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे त्यांना त्रास का होतो किंवा प्रसंगी अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात.घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं,सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रथिने (प्रोटिन) अक्षरशः शिजू लागतात. (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो - माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कायम कसे राहील याकडे लक्ष द्यावे...
ऊष्माघात टाळा
उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे, उष्माघात टाळण्या साठी खालील उपाययोजना करा..
शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या थोड्या कमी तापमानाच्या कालावधीत करा.
काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या.
शक्यतो सुती (कॉटन) पांढऱ्याच रंगाचे कपडे वापरा.
डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा.
आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.
कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा. दुपारी ११ ते ४ पर्यंत शक्यतो काम व प्रवास टाळा.
लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडु देऊ नका.
अशक्तपणा,थकवा, मळमळ, ताप-उलट्या, चक्कर, शुध्द हरपणे इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ आपल्या डाॕक्टरांचा सल्ला घ्या.
ही पोस्ट आपल्या संपर्कातील हजारो लोकांना पाठवा जरूर.
Chan
उत्तर द्याहटवा