नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये विकासाच्या दृष्टीने एक मोठी क्रांती घडणार आहे.ती म्हणजे समृद्धी महामार्गाला सर्वसामान्य लोकांसाठी अनावरण निमित्ताने महामार्ग उघडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा टप्पा असेल.यामुळे महाराष्ट्राला जास्त गती मिळेल. नागपूर ते मुंबई हा मार्ग तयार असल्याने ही शहरे अगदी जवळ आल्यासारखी वाटेल, आणि विकासाच्या गतीला चालना मिळेल. यामुळे नागपूर मुंबई व या दोन्हीतील आसपासच्या भागातील क्षेत्रांना व्यापार करणे सोयीचे होणार आहे. कारण रस्ते हे कोणत्याही देशाच्या प्रगतीला पुढे नेण्याचे काम करतात हे सांगण्यात येते म्हणून त्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यासाठी व महाराष्ट्रासाठी एक वरदानच ठरनार आहे.
नुकताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा समृद्धी महामार्ग पाहणी दौरा झाला … काय ती रस्त्याची भव्य रूंदी…काय तो गतीचा थरार…. विदर्भ व मराठवाड्यासाठी खऱ्या अर्थाने ‘समृद्धी’चा महामार्ग ठरू शकणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने उत्साहवर्धक चित्र आपण पाहीले आहे.
कुठल्याही देशाच्या विकासात रस्ते म्हणजे विकासाचे जाळे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, असे म्हणतात. देशाच्या विकासाचा मानबिंदू हा रस्ते असतो. या रस्त्यांचे जाळे गतिमान असेल तर गतिमान विकासाला चालना मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात येणाऱ्या 11 डिसेंबर रोजी लोकार्पण होत असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भ व मराठवाडा पर्यायाने सर्व राज्याला विकसित करण्याचे एक माध्यम ठरणार आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या उत्साहानंतर खऱ्या अर्थाने या रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना अनुभवायला मिळाला होता. लवकरच तो सर्वसामान्य जनतेलाही अनुभवायला मिळणार आहे.
राज्याच्या विकासात अत्यंत मोलाची भूमिका बजावणऱ्या समृद्धी महामार्गाविषयी एक आपुलकीचे चित्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आपणास पहायला मिळाले. नागपूरपासून सुरू झालेला हा दौरा शिर्डीपर्यंत आयोजित करण्यात आला होता. विमानतळापासूनच याचा प्रत्यय आलेला पहायला मिळाला. विमानतळावर अनेक नागरिक हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायला, आभार मानायला आले होते.
विदर्भ व मरठवाड्यातील लोकांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचा आनंद या दोन्ही भागातील लोकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो आहे. केवळ विमानतळावरच नव्हे तर पाहणी दौऱ्याच्या झिरो पॅाईंट या ठिकाणीही स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांची कनेक्टिव्ही या महामार्गामुळे वाढणार असून यातून विदर्भा व मराठवाड्याचा विकास होण्यास मदत होणार असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया स्थानिकांनी यावेळी दिली.
समृद्धी मार्ग विषयी थोडक्यात सविस्तर माहिती.
एकूण लांबी:- 701 किमी. ,
रस्त्याची रुंदी :- 120 मी. (डोंगराळ भागासाठी 90 मी.)
मार्गिका किती पदरी :- 3 पदरी+3 पदरी =6 पदरी
वाहन वेग किती असू शकतो :- 150 किमी/तास ( डोंगराळ भागासाठी 120 किमी./तास)
प्रस्तावित इंटरचेंजेंस :- 25
रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या नवनगरांची संख्या:- 18
मोठे पूल :- 32
लहान पूल :- 317
बोगदे :- 7
रेल्वे ओव्हर ब्रिज :- 8
व्हाया डक्ट, फ्लाय ओव्हर :- 73
कल्व्हर्ट :- 762
किती जिल्हे, तालुके व गावातून जाणार :- 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे
वे-साईड एमोनिटीज :- 20 (दोन्ही बाजूस मिळून)
माहिती सौजन्य:- महासंवाद