नमस्कार मित्रांनो की KJMEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो भारत सरकारने जवळपास दहा लाख राशन कार्ड अवैध ठरवले आहे ज्यांची यादी लवकरच राशन दुकानदार विक्रेत्यांना पाठवण्यात येऊन हे अपात्र कार्ड रद्द करण्यात येणार आहे
80 कोटीहून अधिक लोक घेतात मोफत राशनचा लाभ
देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत राशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्रता नसलेले करोडो लोक देशात आहेत. देशभरात करोडो लोक मोफत सरकारी राशनचा लाभ घेत आहेत, मात्र आता सरकार अशा लोकांचे राशन बंद करणार आहे. जे सरकारी राशनचा अवैध मार्गाने फायदा घेत आहेत. सरकारने अलीकडेच देशभरातून 10 लाख बनावट शिधापत्रिकाची ओळख पटवली आहेत. या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या राशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ज्यांच्या शिधापत्रिका बनावट असल्याचे आढळून आल्या आहेत, त्यांच्याकडून सरकार आता पर्यंत घेतलेले राशन वसूल करेल.
10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटली आहे
वास्तविक पाहता, देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत राशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोक अजून ही देशात आहेत. असे असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत राशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच, सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. ज्यांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही.
हे पण वाचा:-Maratha Business Loans: व्यवसाय करण्यासाठी मराठा तरुणांना मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज! वाचा सविस्तर
अपात्र राशन धारकांची यादी जिल्हा मुख्यालयाला पाठवून होणार कार्ड रद्द.
अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राशन विक्रेते ही नावे चिन्हांकित करतील आणि अशा कार्डधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. जे लोक मोफत रेशन मिळण्यास खरोखर पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल.
.....या लोकांची ओळख पटली आहे
राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) नुसार जे कार्डधारक आयकर भरतात. याशिवाय ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे. अशा लोकांची यादीही तयार केली जात आहे. त्याचबरोबर अशा लोकांचाही शिधापत्रिका रद्द करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. परत ज्यांनी गेल्या 4 महिन्यात मोफत रेशन घेतलेले नाही. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे मोफत राशन घेऊन दुसरीकडे विकून त्याचा व्यवसाय करतात. अशा लोकांचीही ओळख पटली आहे. बनावट मार्गाने शिधापत्रिका वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या यूपीमध्ये समोर आली आहे. मात्र, तरीही शिधापत्रिकाधारकांची पात्रता तपासण्याचे काम सुरू सध्या देशामध्ये सुरूच आहे.
माहिती सौजन्य:-tv9 भारतवर्ष हिंदी
हे पण वाचा:-व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड आणि पासपोर्ट यांचे काय करावे ? वाचा सविस्तर