नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आता 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 37 लाख शेतकऱ्यांना धान्याऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. नुकताच याचा शासन आदेश या मंगळवारी दिनांक 28/0 2/2023 रोजी राज्य शासनाने काढला आहे. यासाठी प्रति लाभार्थी प्रति महिना दीडशे रुपये याप्रमाणे पैसे बँक खात्यात देण्याची तरतूद केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेला राबवण्यासाठी सरकारने 59 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
ही आहेत 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे
या योजनेच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये यवतमाळ,अमरावती, वर्धा ,अकोला ,वाशिम ,बुलढाणा ,औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड ,धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.
अन्नसुरक्षा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी सदर शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जात होता. मात्र जवळपास एक वर्षापासून ही योजना बंद होती.
२४ जुलै 2015 च्या निकषानुसार होणार योजनेचा लाभ
अन्न महामंडळाने धान्य पुरवठ्यास नकार दिल्याने आता दरवर्षी आधारभूत किमतीत वाढ झाल्यास रोख रक्कमेत ही वाढ होणार आहे. या योजनेत २४ जुलै 2015 च्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. केसरी एपीएल शेतकरी कुटुंबाला ऑफलाइन आणि ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरावा लागणार आहे. ही माहिती तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर च्या माध्यमातून भरली जाणार आहे. अर्जाची छाननी तहसीलदार करतील.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या माध्यमातून होणार ही प्रक्रिया
या योजनेत मयत अथवा गाव सोडून गेलेले लाभार्थी वगळण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. यानंतर ही यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यासाठी ही प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे.कार्डमध्ये मुख्य नावाची महिला कुटुंबप्रमुख असल्यास अशा कार्डधारक महिला प्रमुखाला बँक खाते बँकेत जाऊन उघडावे लागणार आहे. तेव्हाच या योजनेसाठी त्या पात्र ठरणार आहे.